Restaurent Review - थाट बाट

आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने बाहेर जेवण्याचा बेत ठरला. सणाचे निमित्त असल्याने fast food किंवा street food ऐवजी थाळी खाण्याचा विचार योग्य वाटला आणि ऐकीव अनुभवावरून थाट बाट ला जाण्याचे ठरले.

restaurant ला फोन केला तेंव्हा आम्ही reservation घेत नाही, पण नाव लिहून ठेवतो असे सांगण्यात आले. reservation घेणार नाही तर नाव लिहून ठेवण्याचे प्रयोजन मुळीच लक्षात आले नाही.

आत्तापर्यंतच्या थाळी restaurants च्या अनुभवावरून मला एक गोष्ट नेहमी खटकते, ती म्हणजे इथे लोक फक्त खूप भूक लागली म्हणून आणि यथेच्छ जेवण या एकाच उद्देशाने येतात असा सोयीस्कर समज management ने करून घेतलेला असतो. तश्याच mindset चा परिणाम म्हणून इथला ambiance अगदीच दुर्लक्षित वाटला. टेबल खुर्च्या अगदी खेटून मांडलेल्या आणि त्यात वेटर्स आणि ग्राहक यांना एका चिंचोळ्या वाटेतून मार्ग काढावा लागत होता.

जेवण ठराविक राजस्थानी पद्धतीचे होते ज्यामध्ये भरपूर पदार्थ available होते. चवीला जेवण छान होते आणि अपेक्षेप्रमाणे गरम देखील. तसेच नावाला शोभावे म्हणून जेवण चांदीच्या ताटात serve करण्यात आले. हे सर्व plus points होते.

पण वाढताना वेटर्स अगदी घायकुतीला आले होते, त्यामुळे वाढण्याआधी प्रत्येक पदार्थ थोडातरी ताटबहेर सांडत होता आणि जेवणाचा थाट कमी करत होता. background ला music play होत नसल्यामुळे एकंदर गोंगाट जास्तच जाणवत होता.

overall चवीच्या आणि जेवणाच्या दृष्टीने restaurant changle watale पण management ने ambiance आणि service वर भर देण्याची नक्कीच गरज आहे.

नाव - थाट बाट
लोकेशन - कर्वे रस्ता, कोथरूड, पुणे
खाद्य प्रकार - राजस्थानी थाळी
रेटिंग - २/५

नवा उपक्रम - Restaurant Reviews

गेल्याच आठवड्यात long term साठी  पुण्यात राहायला आले. इतकी वर्ष बाहेर राहिल्याने इकडच्या आठवणींची पाटी  अगदी कोरी झाली आहे. तसंही ज्या जुन्या आठवणी आहेत त्या सगळ्या औरंगाबादच्या आणि कॉलेज मधल्या, त्यामुळे पुण्याबद्दल माझ नक्की अस काही मत सध्या तरी नाहीये. पण प्रत्येक नव्या गोष्टीकडे कुतीहालाने बघायचे असे मात्र ठरवून टाकले आहे


आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने बाहेर जेवायला जाण्याचा बेत केला. इथले खाण्याचे शौकीन आणि आणि इथली अनेक खाद्य श्रद्धास्थान मला ऐकून माहित असल्यामुळे एखादा मस्त अनुभव घेण्याची उत्सुकता नक्कीच होती. अर्थातच आत्तापर्यंतच्या सवयीप्रमाणे restuarent येल्प/फोर स्क्वेअर/ झोमाटो वगैरे वर शोधण्याचा एक प्रयत्न करून पहिला आणि तेंव्हा प्रकर्षाने जाणवले कि इतके  खाण्याचे शौकीन असूनदेखील restaurant चे online reviews अगदी नावालाच आहेत. तेंव्हाच ठरवले कि ब्लोग वर restuarent चे reviewes टाकायचे आणि वेब वर सुद्धा.


तसा हा नवीन उपक्रम करायचा विचार बऱ्याच   दिवसांपासून होता. एकंदरीत च online platforms भरपूर उपलब्ध असूनही त्यांचा योग्य वापर करणारे आणि content contribution करणारे लोक खूपच कमी अहेत. आणि त्यामुळे नुकसान देखील आपलेच होतेय. चांगले दर्जेदार businesses व्यवस्थितपणे publicize होत नाहीत आणि आपल्याला देखील ऐनवेळी एखादी सेवा दर्जेदाररित्या  कुठे उपलब्ध होईल हे समजत नाही.


असो तर आता या नवीन उपक्रमाला माझ्या नव्या नवलाईचा हुरूप चढला आहे. आणि म्हणूनच आजपासून मी भेट दिलेल्या सर्व restaurant चा honest review लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.

Tiny Beautiful Things


गेल्या आठवड्यात एक खूप सुंदर पुस्तक वाचनात आले.




हे पुस्तक म्हणजे पत्रांचा संग्रह आहे. लेखिका एका website वर नियमितपणे लेख लिहिते. ज्यामध्ये लोक आपली प्रेम, वैयक्तिक  जीवन, व्यवसाय, ह्याबद्दल असलेल्या कठीण प्रसंगांचे विश्लेषण करतात आणि लेखिकेचा दृष्टीकोन किंवा त्या प्रसंगाला सामोरे कसे जायचे ह्याबद्दल सल्ला मागतात. हे सर्व पत्रव्यवहार पूर्वी अनामिकपणे झालेले आहेत. म्हणजेच पत्र लिहिणाऱ्याचे व लेखिकेचे नाव पत्ता गुप्त होता.


अर्थातच हि सगळी पत्रे अतिशय भावनिक, हृदयद्रावक आणि अत्यंत खाजगी अश्या प्रश्नांची आहेत. प्रेम, लग्न संबंध, घटस्पोट, व्यसन, शरीरसंबंध , समलैंगिकता, मातृत्व/ पितृत्व  असे अनेक संवेदनशील विषय आणि त्यामध्ये पेचात सापडलेल्या व्यक्ती.  ह्या व्यक्ती शक्य तेव्हड्या मोकळेपणाने आपल्या परिथितिचे वर्णन करतात आणि समोर आलेल्या प्रसंगाला, परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी काय करावे असा सल्ला लेखिकेला मागतात. उत्तरादाखल लेखिकेने लिहिलेली पत्रे निव्वळ सुंदर अशी आहेत. त्याला कारणही तसेच आहे…


लेखिकेच्या स्वतःच्या आयुष्याला  दु:ख्खाची एक झालर आहे. आईवडिलांचे उधवस्त वैवाहिक आयुष्य, त्यामुळे बालपणी आलेली असुरक्षितता, गरिबी, आईच्या अकाली जाण्याने होरपळून निघालेलं तरुणपण आणि त्यातून एखाद्या फिनिक्स पक्षासारखी झेप घेऊन उठणारी लेखिका. ती आपल्या प्रत्येक पत्रात गत आयुष्यातील आठवणींचे, प्रसंगांचे दाखले देत परिस्थितीला डोळसपणे बघण्याची दृष्टी प्राप्त करून देते. प्रश्नांदाखल लिहिल्या पत्रातून नेमके उत्तर शोधण्याची संधी वाचकाला देते.


ह्या पुस्तकातील प्रत्येक पत्र वेगळे आहे, त्यातील प्रश्न आणि परिस्थिती वेगळी आहे. काही प्रसंग अत्यंत कठीण आहेत, काही व्यक्ती मानसिकदृष्ट्या अतिशय खचलेल्या आहेत. पण प्रत्येक पत्र कुठेतरी जाउन आपल्या मनाशी भिडणारे आहे. हाडामासाची माणसे आणि त्यांचे दुख्ख समजून घेताना आपल्या डोळ्यांच्या कडा  नकळत ओलावतात. आपल्याही माणूस असण्याची जाणीव अधिक गडद करून जातात.  त्याबरोबरच वर - वर आनंदी दिसणाऱ्या समाजाच्या मनात दडलेला एकटेपणाचा काळोख काही वेळा भकास करायला लावणारा आहे.


पण पुस्तकाच्या शेवटी मात्र प्रत्येकाच्या माणूसपणाला embrace करणारा आहे. कितीही वाईट परिस्थिती तून जात असलो तरी ‘everyone of us has a right to enjoy the tiny beautiful things!’ असं सांगणारा आहे. आणि ह्यातच पुस्तकाचे वेगळेपण सामावलेले आहे.


आपल्या रोजच्या सामान्य वाटणाऱ्या आयुष्याकडे एका नव्या दृष्टीकोनातून बघायचं असेल तर हे पुस्तक नक्की मिळवून वाचा.