कलाकार

मला आठवते ती 'त्या'ची आणि माझी पहिली भेट शाळेत असतानाची. सातवी च्या सुटट्यात मुंबईला आत्त्याकडे पहिल्यांदा ऐकलेले 'त्या'चे गाणे "तू..." ने अक्षरशः वेड लागले होते. खरतरं तेंव्हा त्याच्या गायकीपेक्षा 'त्या'चा क्यूट चेहरा जंपिंग डॅन्स स्टेप्स हेच जास्त आवडले होते.



अजूनही आठवते, तो आल्बम बघून अनेक टीनेजर मुलांनी नाव्हयाकडे जाउन स्पेशली करून घेतलेला मशरूम कट. त्यानंतर बर्‍याच सलॉन वाल्यांनी 'तो' आमच्याकडेच केस कपतो असे सांगून भरपूर मार्केटिंग केले. शाळेतल्या आम्हा मुलींचा तर 'तो' प्रचंड लाडका..., पहिल्यांदा टीनेज स्टार म्हणून कोणाचे पोस्टर रूम मधे चिकटवले असेल तर ते 'त्या'चे.

पण एक गायक म्हणून 'तो' खरा खुरा मनाला भावला जेंव्हा पहिल्यांदा वॉकमॅन मधे त्याचे "दीवना" ऐकले तेंव्हा. "दीवना... " मधली सगळी गाणी इतकी आवडली की ज्यांच्यावर picturize झाले ते मक्ख चेहेरयाचे मॉडेल्स सुद्धा एकदम स्टार वगैरे वाटायला लागले. :) "दीवना..." मधली सगळीच गाणी सुरेख, पण माझे सर्वात आवडते गाणे "कुछ तुम सोचो, कुछ हं सोचे फिर खुशी का मौसम आए....". प्रेमाची व्याख्या अजुन कोणती असुच शकत नाही इतका खोलवर परिणाम 'त्या' च्या गाण्याने माझ्यावर केला.

त्यानंतर 'तो' अनेक वर्ष regularly घरी येत राहिला "सा रे ग म " चा निवेदक म्हणून. त्याचा आवाज गाताना जितका मधाळ तितकाच निवेदन करताना मृदू, संयमीत...

प्रत्येक स्पर्धाकचे प्रोत्साहन, कौतुक, परीक्षकांविषयीचा आदर, आणि संगीतवर मनापासून असलेले प्रेम; त्याच्या प्रत्येक निवेदनातून प्रेक्षकाच्या थेट मनापर्यंत पोचले. त्याचे टिपिकल आवाजात "नामष्कर आपका स्वागत संगीत के उस सुरीले सफर में जिसका नाम है, TVS 'सा रे ग म' " आताही लिहिताना कानात वाजल्यासारखा वाटला. "सा रे ग म" चा दर्जा 'त्या' च्या काळात उत्कृष्ट होता हे वेगळे सांगायलाच नको.

शब्दांवर अक्षरश: प्रेम करून ते सुरंमधे गुंफायचे, इतके की भावना त्या शब्दान्पेक्शा वेगळी अशी काही नसावीच, हे सर्वात प्रथम 'त्या' ने शिकवले. 'त्या'च्या उत्कट शब्दांनी जेमतेम performance असलेली अनेक गाणी आस्विमारणीय झाली.
"अच्छा सिला... " सारखा ब्रेकप सॉँग ने सगळ्यांच्या परिचयाचा झालेल्या त्यानेच प्रेम करायला शिकवले "मुझे रात दिन बस मुझे चहती हो", romance शिकवला "इन लम्हो के दामन में..", सौंदर्या चे स्वरबद्ध रूप साकारले "साथीया..." मधून,
डॅन्स शिकवला "आखियो से गोली मारे... " मधून. आणि जीवनाचे सार शिकविले ते "कल हो ना हो .. " मधून. 'त्या'ने "कल हो ना हो... " इतके अप्रतिम गायले की मला SRK ला सुद्धा आवडायला भाग पडले :). "तानाहाई.." आणि "जाने नाही देन्गे तुझे... " ने एक वेगळीच घालमेल त्याने शब्दात बांधली.

प्रेक्षकांच्याच ह्याच प्रेमापोटी असेल कदाचित, 'तो' अजुन एक गॅंबल खेळायला निघाला, actor बनण्याचे. तिथे नशीबाने म्हणावी तशी साथ दिली नाही, कदाचित तो त्याचा पिन्ड नाही.. पण त्या अपयशामुळे त्याच्यातला उत्कृष्ट गायक कधीच superseed
झाला नाही. उलट त्याच्या प्रत्येक गाण्याने तो बनत गेला अजुनाच परिपक्व.

3 idiots ची success चे योग्या credit जेंव्हा 'त्या' च्या कलेला मिळाले नाही तेंव्हा, 'त्या' च्यातल्या मनस्वी कलाकारने विधु चोप्रा साठी गायला नकार दिला.



त्यानंतर गेल्या वर्षी 'तो' पुन्हा एकदा नव्याने भेटला "अभी मुझमे कही..." च्या रूपात. ते गाणे त्याने ज्या तन्मयतेने म्हटले ती तन्मयता एका जातीवांत कलाकरकडेच सापडेल. नुसत्या शब्दानी आणि सुरानी संपूर्णा गाणे पेलवुन धरण्याचा आणि mesmarize करण्यच्या अपूर्व कलेचा सुंदर अविष्कार त्या गाण्याच्या रूपात झाला.

"अभी मुझमे काहीं..." नेहमीसाठी माझ्या मनाच्या एका कप्प्यात तेवत राहील, शांत पणतीप्रमाणे...

गेल्या अठवड्यात, त्याला प्रत्यक्ष बघण्याची, ऐकण्याची संधी मिळाली कॉन्सर्ट होती "क्लोज़ टू माय हार्ट". त्याच्या आवडत्या प्रत्येक गायकीला आणि गायकला ट्रिब्यूट देणारा कार्यक्रम. साधारण साडे तीन तसाची ती सुंदर संध्याकाळ कधीही न वीसरू शकणार्‍या क्षणांचे चांदणे मनात शिम्पुन गेली. अजूनही त्या स्वरान्मधे मी कुठेतरी हरवली आहे, त्याने गायलेल्या गाण्यासारखी...

अश्यावेळी गुलज़ार मदतीला येतात. त्यान्च्या ओळी अठवतात..

वक़्त के सितम
कम हसीन नहीं
आज हैं यहाँ
कल कहीं नहीं

वक़्त से बड़े अगर
मिल गये कहीं

मेरी आवाज़ ही पहचान है
गर याद रहे

नाम गुम जाएगा
चेहरा यह बदल जाएगा
मेरी आवाज़ ही पहचान है

मुठितुन निसटणारा निर्भेळ आनंद

गेल्या वर्षी वेळ मिळेल तसे आणि सुचेल तसे ब्लॉग पोस्ट्स लिहिले, पण मनापासून समाधान वाटेल अशी एखादी पोस्ट उतरलीच नाही. त्यामागचे महत्वाचे कारण लिहिण्यातला हरवलेला सूर... खरतरं नुसत्या लिहिण्यातलाच नाही तर विचार करण्यातला सुद्धा... हल्ली विचार करणेच कमी झाले आहे. एकसंध, सुरळीत, तथाकथीत झाले आहे सगळे.

असे असले तरीही आठवड्या दोन आठवड्यातून कधीतरी निवांत मोकळा वेळ मिळतो. बरेचदा हा वेळ काहीतरी निरर्थक TV वर बघण्यात किंवा ब्राउज़िंग करण्यात निघून जातो. आणि शेवटी जेंव्हा TV किंवा लॅपटॉप कडे बघून डोळे थकून जातात तेंव्हा आम्ही झोपतो. पण मनात मात्र सारखे वाटते काहीतरी मोठे, mesmerize करणारे घडावे, दिसावे, वाचावे...

अर्थातच काही घडत नाही की, घडावे असा प्रयत्नही माझ्याकडून होत नाही.

एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवत रहाते आणि प्रचंड खटकते ती म्हणजे माझे अत्यंत कमी झालेले attention span. कुठलीही गोष्ट समोर आली तरी त्यामधे मी ५ - १० मीनिटान्पेक्शा जास्त काळ रमु शकत नाही. एखादे गाणे १० सेकंद ऐकून ते चांगले की वाईट हा शिक्का लावून टाकते, एखाद्या लेखातील keywords वर - वर वाचून तो कसा असेल ह्याचा अंदाज मनात बांधून घेते, सिनिमा चे ट्रेलर १ मीनिट बघून, तो बघायचा की नाही हे मानात ठरवून टाकते...

कदाचित सर्व गोष्टी सहज उपलब्ध असल्याने हे असे झाले असेल. अमुक एक गोष्ट आपण मिळवू शकतो, शिकू शकतो, किंवा गरज पडल्यास माहीत करून घेऊ शकतो हा माझा confidence (?) बर्‍याच प्रमाणात सध्या readily available असलेल्या latest and greatest technology वर आधारलेला आहे.

एखाद्या सिनेमा चे नुसते ट्रेलर बघून आणि त्याचा विकी वाचून मी सहज त्याविषयी माहिती मिळवु शकते. पण मग actual सिनेमा बघायला जाण्यात काही point आहे की नाही? social media वर virus सारख्या पसरणार्‍या ह्या अपडेट्स पर्सनली माझ्यातील अप्रूप वाटण्याचे दोन चार क्षण अक्षर्ष: हिरावून घेत आहेत.

एखादे गाणे, सिनेमा, पुस्तक स्वत: वाचण्याच्या आधीच त्यावरील लोकांचे मत सगळीकडे मोठ्या अक्षरात वॉल पोस्ट च्या रूपाने झळकते, सहाजिकच आपणही लोकांच्या चश्‍म्यातून ते काही काळ बघण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करतो. पण बहुतेक वेळा त्यांना जे दिसते ते मला का दिसत नाही अशी घालमेल मनात चालत राहते.. आणि निराश होऊन अपण एक बाजू नीवडुन आपले मत बनवून टाकतो. अश्याने एखाद्या नितांत सुंदर कलकृतीमधे समरसून जाण्याचा आणि नविण्याचि सुंदर अनुभूती मिळण्याचा निखळ आनंद हरवून बसतो.

कधी कधी मित्र मैत्रिणिंच्या फोटो आलबम्स मधे बघून बघून एखादे पर्यटन स्थळ इतके परिचयाचे होऊन जाते, की तिथे स्वत: भेट दिल्यावर होणारा भव्यतेचा, सुंदरतेचा आनंद दहापटिने कमी जाणवतो. काही वेळा एखादी जागा overrated वाटायला लागते, आणि तिथे जाण्याचा उत्साह विरून जातो.

लहानपणी एका जागी बसून ३ - ४ तास पुस्तक वाचायचे, सन्ध्याकाळि तासभर देवासामोर शुभंकरोती म्हणायचे, शाळेत मूल्य-शिक्षणाच्या तासाला अर्धा तास ध्यान लावून बसायचे. इतके एकाग्रपणाचे संस्कार माझ्यावर होऊनही गेल्या फक्त ५ वर्षात internet आणि त्या ओघाने येणार्‍या अनेक गोष्टींमुळे माझी एकाग्रता कमालीची कमी होत आहे.

पुन्हा एकदा लहानपणिचे शिकलेले सगळे एकवटुन स्वत:वर एकाग्रातेचे संस्कार करायची वेळ आली आहे. पहिली पायरी म्हणून स्वतः ला social media पासून शक्य तितके दूर ठेवणार आणि एखादे छानसे पुस्तक हाती धरणार आहे.